मऱ्हाटीची येक लय मधाळ बोली हाये, तिला डांगाणी/मावळी भाशा म्हंत्यात. पण ही भाशा निऱ्ही तोंडी सोरुपातच हाये, ती आजवर कोन्हा लिव्हली नय. ही भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर ह्या पट्ट्यात बोलली जातेय. ही भाशा लय ग्वाड हाये. दुसऱ्या मराठीच्या बोलींसारखंच सब्द हायेत पण उच्चार लय येगळं हायेत, त्या उच्चारामुळं भाषा लय ग्वाड वाटतेय. म्हणी तं इतक्या हायात का इचारता सोय नय. गाणी, भारूड, भजना ही सगळी तं ह्या बोलीत कितीतरी हायात, पण ह्या समदा तोंडी हाये. तिचा ह्यो मोठा वारसा कुढंतरी जपून ठिवावा म्हणून हा एक परेत्न