मऱ्हाटीची येक लय मधाळ बोली हाये, तिला डांगाणी/मावळी भाशा म्हंत्यात. पण ही भाशा निऱ्ही तोंडी सोरुपातच हाये, ती आजवर कोन्हा लिव्हली नय. ही भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर ह्या पट्ट्यात बोलली जातेय. ही भाशा लय ग्वाड हाये. दुसऱ्या मराठीच्या बोलींसारखंच सब्द हायेत पण उच्चार लय येगळं हायेत, त्या उच्चारामुळं भाषा लय ग्वाड वाटतेय. म्हणी तं इतक्या हायात का इचारता सोय नय. गाणी, भारूड, भजना ही सगळी तं ह्या बोलीत कितीतरी हायात, पण ह्या समदा तोंडी हाये. तिचा ह्यो मोठा वारसा कुढंतरी जपून ठिवावा म्हणून हा एक परेत्न
सन्माननीय वाचक
Tuesday, July 31, 2018
सागोतीचं ठाव
Friday, July 27, 2018
डांगाणातल्या पाच जेम्स बॉन्डांची गोट
मंग काय करावा?
तव्हा डांगाणात पाच पटेकर भाऊ व्हतं. पाचीच्या पाची एकदम रगाट गडी. लढाई खेळाया तं ते पटाईत व्हतंच, पण कंच्याय आवघाड परिस्थितीत कंचीय जिकिरीची कामगिरी करायची तं पाच पटेकर भावांशिवाय आख्या माराष्टात दुसरा कोन्ही नव्हता. हे पाचीच्या पाची गडी कंच्याय डोंगरावं अन कंच्याय कडेवं घोरपडीवानी सहाज येंघून जात. कोन्हाच्या नदरं न पडता कुढय पोहोचत. सोताकं काहीच हात्यार नसला तऱ्ही एकएकटा पाच साहा तलवारीवालेंली एकाच येळी गुंगारा देत. हे पाचीय भाव पाच पांडवासारखं शूरयीर तं व्हतंच, पण जेम्स बॉण्डसारखं चलाख अन चपळय बी व्हतं.
खाड्या अन भांगऱ्या सरदारानी जव्हा तीरमकाचा किल्ला जिखायचा इडा उचालला, तव्हा त्ये आपापलं सैनिक घेऊन तिरमकाच्या खाली गेलं अन किल्लेची पहाणी केली. किल्ला हेरल्यावं मातर तेंचं सैनिक काय लढाईला जाया तयार व्हईनात. लढायचा रह्यला लांब, ह्या किल्ल्यावं येंघता सुदा येणार नै, आसा त्ये म्हणाया लागलं. समदी म्हणत का आपु कसाय करून वर येंघलोच तऱ्ही लढायची ताकत काय रहेणार नय अन आपु समदी वाजीव मरू. म्हणून ही कामगिरी सोडून द्यावा आसा समदी म्हणाया लागली. समद्या सैनिकांमंधी आशी घालमेल झालेय ह्या पहून मंग पटेकर बंधू म्होरं आलं. त्ये म्हणालं आरं काय लढायच्या आंधीच आसं घाबरून जाता? आम्ही आसताना तुम्ही गड चढायची कह्याला काळजी करीतंत? ह्या जगात आसा कंचाय कडा नय जेच्यावं आम्ही पटेकर येंघून जाऊ शकत नय. आम्ही वर जाऊन सम्देनली वर घेऊ. अन मंग त्या मुघलांली आपु सहज कापून काढू. त्येंनी आसा म्हणला तरी सैनिकांचा भ्या काय जाईना. मंग मातर पाचातलं द्वान पटेकर सोताच निंघालं. त्या दोघांनीच गडावं चढाया सुरवादी क्येली. ह्ये द्वान पठ्ठे समोरचा उभाच्या उभा कडा सहज येंघून वर ग्येलं. येवढाच नय तं फक्त द्वानच तासात किल्ल्यावरल्या मजबूत सुरक्षेमंधून सम्देनली गुंगारा देऊन कोन्हाला न कळता थेट किल्ल्याच्या किल्लेदाराचा चांदीचा हुक्का घेऊन त्ये दोघंय खाली आलं. पटेकर भावांच्या ह्या कामगिरीना समदेंली लय फुराण चहढला अन समदी सैना पुरी जोमाना लढाया तयार झाली.
मंग लढायीची यवजना तयार झाली. खोटी खोटी फकिरा-बाबांची सोंगा घेऊन किल्ल्यावं गपचिपपना जाऊन पटेकर बंधूंनी किल्यावरचं काही आधिकारी अन किल्लेदाराच्या येका जवळच्या सहकाऱ्याला फितावला अन किल्लेची समदी माहिती काढून घ्येतली.
मंग लढाईच्या दिशी तिरमक देवाला योक बोकड कापून कामगिरी सुरु झाली. सगळ्यात आंधी पटेकर बंधू कडा येंघून वर ग्येलं, अन मंग त्येंनी वरून दोराच्या शिड्या खाली सोडल्या. त्या शिड्यांवरून मंग ५०० जण किल्ल्यावं चढून ग्येलं. वर पोहोचताच समदेनी थेट किल्ल्याच्या मुख्य शिखरावं हल्ला करून तिढल्या मुघल सैनिकांली कापून काहाडला. अन आपला झेंडा लावून हर हर महादेवच्या घोषणा देत इजयाची शिंगा वाजावली. मंग त्ये किल्ल्यातल्या दुसऱ्या सैन्यावं चालून ग्येलं. अचानक येवढा आवघाड कडा चढून येवढं लय सैनिक वर आलं ह्या पहून मुघला जाम बेहेली. न लढताच कित्येक जण वाट फुटल तीढुन पळून ग्येलं. काहींनी कड्यावरून उड्या मारल्या अन ठेचून मेलं. कित्येक मुघला हातपाय मोडून जखमी झाली. जे मुघल किल्लेवं लढाया थांबलं तेंली सम्देनली मारून टाकण्यात आला. अन मंग किल्ला ताब्यात घेतला.
येवढा मोठा पराक्रम करून किल्ला जिखून घेतल्याबद्दल मंग पेशयांनी पटेकर भावांली चाळीस हजाराचा इनाम दिला. थोरल्या पटेकराला पालखीचा मान दिला. अन खेरुजी नाईकाला सुदा पालखीचा मान आन बारी ह्या गाव इनाम म्हणून दिला.
ह्याच वीर तुकडीना मंग रतनगड, कलाडगड, अलंग, कुलंग हे किल्लय बी जिखून घेतलं. रतनगडावंय बी तिरमक सारखंच वर जाऊन दोरीच्या शिड्या खाली सोडून द्वान-अडीचशे गडी येंघून गेलं. तव्हा जव्हारचा राजा अन त्येच्या घरची सगळी लोका रतनगडावंच व्हती. रतनगडावं लय मोठी लढाई झाली अन दोन्ही बाजूचं मिळून द्वानशे ल्वाक म्येलं. जव्हारचा राजा कसाबसा सुटून ग्येला. याबदल पेशयांनी ३० हजार रुपये बक्षीस दिलं आन यमाजी भांगरे ह्या सरदाराला पालखीचा मान अन साकीरवाडी ह्या गाव जहागीर म्हणून दिला.
तं आसं व्हतं आपल्या डांगणातलं ह्ये पाच जेम्स बॉण्ड म्हंजी पाच पटेकर बंधू.
Wednesday, July 25, 2018
गळ
गळान मास धरायची पकी जूनीच कला हाय.
मला आठवाताय तसा आमच्याक त सगळी लाॅका ज्याम गळाव जात्यात. मोक्कार मास धरीत्यात बरका.
तसाच एकदा मी बारीकच होतु सकाळची नेहरी झालेव मी चूल्हीमोहर शेकत बसलू व्हतु तेवढ्यत मह्या मोठ्या भावाना खळ्याक जाऊन हाक मारली आन् सांगातत्ला सित्या टिकाव नथ कुडावना आनर मी झापाच्या बहेर निघालू आन् दारातल्या सपरीला टिकाव, कुडावना, व्हाता पर मंग म्या त्या नैय नेला कुदळीच नेली. इच्चरला कयाला लागतीय र त भाऊ?
म्हण गांडुळ खनाया आन् ते गांडुळ कयाला?
त म्हण गळाला लावाया.
आन् म्या परत इच्चारला गळ म्हंजे?
आर मासेली गळ लावयचा आन् ते मास गांडुळ खाया म्हणून येतत आन् गळच तेंच्या तोंडाला रूतुन जातोय आन् मासा पका तरफडोतोय मंग आपुन गळ ऊडऊन घ्याचा तो मासा पीसइत ठुवायचा तसाच करून करून पक मास धरायच आन् संद्याकाळी आय मास्यांचा कोरड्यास करील आपलेली खाया...
तीतक्यात मला भाव म्हण्ला पळत पळत व्होय र दात मंजनीचा रीकामा डबा आन.
मी पळत पळत घरी गुलू डबा आनुन दिल्हा मंग ते सगळ गांडुळ त्या डब्यात भरून, द्वान ऊडाव गळ घेऊन नदिक गोलो आम्ही दोघ भाव.
गळाला गांडुळ लाऊन टाकला. लगेच बाळोखी लागली मह्या गळाला आन् ऊडावला गळ घेतली काढुण परत लावला आसायकरू एेक्याच जाग्याव मला सात मास लागल तवा पसुन भाऊ मला सारखच घेऊन जायाचा एका दिसी काय झाला मी एकटाच मासेली गेलू व्हतू नदिचा पुर ओसारला व्हाता आन् गढुळीही कमीच व्हती म्या लावला गळ मासाच लवकर लागना मीइच्चारातच पडलू काय झाला बुव्वा?樂
मंग वजच गळ काढला हेरीतोत काय गांडोळा सगट खेकड घेऊन गेली मह्यावाला गळ. म्हन्ला आता परत घरी गेल्याव काॅलदांडाच...
पार हिंगमोड होऊन निघलू परत झापाक (घरी) चलता चलता वावराच्या मेंडाक ध्यान गॅला त पकीना आळींम व्हाती मंग ज्याम आळींम नेली घरी आयना मासेली वाटेल मिर्चीमसाला आळम्बीच्याच कालवाणात घातला व्हता. मास्याच्या आन् सागोतीच्या कालवाणा सरखाच लागला रातच्यायळी मह्या "बा" ना इच्चारला कायर शिकारी आज आळीमीची शिकार केली.? मंग म्या "बा" ला सांगात्ला मह्यावाला गळ खेकडीना खुडुन नेला ना .
तव्हा मव्हा "बा" सांगाया लाग्ला आर गाडीस्या आता उडाव गळाला मास नैय लाग्नार ह्या दिवसात खुटगळ लावाया लागतत.
त्यांचाय शिजन रह्याताय उडावगळ (छडी) , खुटगळ, चमक्यागळ आस तेन्च परकार रहेतत.
मंग म्या तीन्ही शिजनाच मास धर्ल त्याच सालापसुन मास धराया शिकलो...
पानेची पहाळी...
आय पळतच दाराक आली न पहेते त काय, आभाळ भरून आला व्हता. कंच्याय टायमाला पाऊस येणार व्हता, तशी आय वराडली, बारख्या पॉंरा कुडयात पग जरा, तिला राहवलाच नय..
म्हतारी आली तवर मोठी पहाळी आली म्हणून आमी पोहळीला कोंबड्या बसत्यात तिथं बसलो ..
म्हतारीना पदराखाली धरून आमाली चुलीपुड बसवून पितळीत च्या पेया दिला ...
मंग दारामाग उभं राहून पाऊस हेरीत रयलो..
गणपत रामचंद्र कोंढवळे...
Friday, July 20, 2018
आगोट
Wednesday, July 18, 2018
मही शाळा - जिवन शिक्षण विद्या मंदीर
Sunday, July 15, 2018
उलाटान
-म्या आर्जूना बांड्याचा सित्या
डांगाणी म्हणी
अर्थ : गावातला माणुसच गावचा राजकारण करू शकतो, परगावच्या माणसाने शहाणपण दाखऊ नये.
अर्थ : मोठ्या असामीचा नुसता मोठेपणाच पाहून घ्यावा
अर्थ : कायम दरिद्री माणूस चांगल्या ठिकाणी दिसणे
अर्थ : दुसऱ्याच्या जीवावर खर्च करणे
अर्थ : थोडया कमाई साठी जाऊन जास्त नुकसान होणे
अर्थ : कितीही केल तरी लबडाची गाठ लबाडाशीच
अर्थ : कमी दर्जाच्या व्यक्तीला जास्त महत्व देणे
अर्थ : राहणीमान कडक नियमात पण वागणं व्याभीचारी
अर्थ :मुळ बाब सोडून भलतीकडेच खर्च करणे
अर्थ : गावचा प्रमुख नालायक असेल तर पुर्ण गावच नालायक ठरतं
Saturday, July 14, 2018
मोडा
आवणीच्या दिसात माॅडा(सुट्टीचा दिवस आपल्या शेतकरी बांधवांसाठी) पाळतात.या दिसी शॅतातला कंचाच काम नय करती.परतीक गावात यगयगळा वार असतो.आमच्या गावातली लाॅका दाॅन मोडं पाळीत्यात.सनवार अन मंगाळवार .मंगाळवार रतनुबाईचा वार अन सनवार मारूतीचा वार.या दोनमंधून मंगाळवार लय कडक धरीत्यात.पर सनवारी जरासी कामा करीत्यात बरका पर औत नय धरती.
पर लाॅका हे दिस वाया नय जाऊन देत.ह्या दिसी सामराद कोलटेंबा इकडं आवाया जातात.फक्त सिव वलांडायची.मंग त्या गावचं मोठं धनी दाळ गुळ साखार अन बोकडाचा वाटा यचेव माणसा आवाया नेत्यात.
त्या गावाची लाॅका बी तेंच्या मोड्याला या गावात आवाया यत्यात .म्हंजी खदली बदली .
मंग दमाना का होईना समद्या लाॅकांची आवणी पुरी होतं .
माॅडा हा कुळसाईचा वार .
म.सो.लांघी.रतानवाडी
मांडव..
Friday, July 13, 2018
आपल्यावाल्या काही म्हणी
1) पयाचा गावाकं आन् चलायचा देवाकं
एखाद्याच आपल्या कामाकडे लक्ष नसेल तर असे म्हणायचं . बर्याचदा एखादा दुर्लक्षामुळे पडला असे म्हटले जाते.
2) पैसा ना आडका न जीव घेई धडका
काही तरी खरेदी करायची खूप ईच्छा मनात असायची पण पैसे नसल्यामुळे घेता येत नसेल तर जीवाची घालमेल होते.
3) रूपया मैयना (महिना ) न कवायका होयना
एखादं कामं खूप दिवस लांबलं कि ते किती का निंवातपणे चालत असेल तर वैतागून असे बोलतात.
4) उशाला पोळी न झोपी जाईना कोळी
कोळ्याला पोळी कधीतरीच भेटते. ती खाण्यास तो एकदम उतावीळ होतो. तसं एखाद्या गोष्टीसाठी एखादा खूप उतावीळ झाला तर असं म्हणतात.
5) सोताचा ठिवायचा झाकून आण दुसऱ्याचा पयाचा वाकून
साधारण द्वीअर्थी असली तरी मुख्य अर्थ म्हणजे आपली चूक असेल तर ती लपवून ठेवायची मात्र दुसर्याची चूक दिसली की ती दाखवणारा जो असेल त्याला उपहासाने अस म्हणतात.
6) चोराला का सांगावा पर पोराला सांगू नय
एखादे काम लहान मुलाला, किंवा बालीश माणसाला सांगितले की तो नेमका ते चूकवणार किंवा काही तरी घोळ घालणार तेव्हा उगाच याला काम सांगून चूक केली हे वैतागून सांगताणा.
7) खाजवून खरूज नय काढायची
खरूज झाल्यावर जर ती खाजवली तर अजून खाज सुटते tya मुळे ती खाजवू नये. तसेच एखाद्याने विषय किंवा भांडण मिटलं असताणा तो विषय पुन्हा काढून ताप केला , किंवा तो विषय काढू नको असं सांगताना.
8) कुंभारा पेक्षा गाढाव हुशार
एखादे काम करताना मोठ्या माणसांना जर लहाणांनी काही सल्ला दिला आणि तो चूकीचा असला की लहान जणांना टोमणा हाणताना.
9) मोठा घर पोकाळ वासा
एखाद्याच्या मोठेपणा तला फोलपणा सांगताना. बरेचदा गावातल्या मातब्बरांची किंमत काढताणा.
10) नाचता येईना आंगाण वाकडा, सैपाक येईना ओली लाकडा
--
पावसाचा गाणा
Thursday, July 12, 2018
क्रांतिवीर राघोजी भांगरे गीत
“ रमायाबाई म्हणे राघू माझा गं लहान
मावळ मुलुखाचा राजा होईल महान !
रमायाबाई म्हणे राघू माझा गं बल दंड
जुलमी सावकाराविरोधी हा पुकारील बंड !!”
राघूनं केलं बंड नाव सांग भांग-याचा !!
राघूनं केलं बंड नितरोज हरघडी
कत्तल केली पोलिसांची मुंड्या लावल्या हो झाडो-झाडी !!
राघूनं केलं बंड कुलंग गडाच्या माळीला
गो-या साहेबांच्या टोप्या ह्या गुंतल्या हो जाळीला !!
राघूनं केलं बंड बंड घोटी खंबाळ्याला
धरणी काय आली कोंभाळण्याच्या बांबळ्याला !!
राघूनं केलं बंड बंड तीरंगळ गडाला
यानं बसविला हादरा इगतपुरी या पेठाला !!
राघूनं केलं बंड बंड गौराया पुराला
कापली गो-यांची नाकं कान टीळा रक्ताचा लावला !!
राघूनं केलं बंड सरकार बोलू लागला
कापाया नाक कान ईश्वरानं बंड नेमला !!
राघूनं केलं बंड बंड टाके देवगावाला
वैरी त्रिंबक कांदडी यमसदनी धाडीला !!
राघूनं केलं बंड अंजनेरी या गडाला
यानं बसविला हादरा गाव तिरमक पेठाला !!
राघूनं केलं बंड बंड सुरगाणा पेठाला
कापलीया नाकं लुटलं सावकारशाहीला !!
राघूनं केलं बंड बंड पेठ तालुक्याला
कापलीया नाकं चहू मुलुखी गाजला !!
राघूनं केलं बंड सप्तशृंगीच्या गडाला
यानं बसविला हादरा दिंडोरी या पेठाला !!
राघूनं केलं बंड नाशिक हवेली लुटली
काढून लग्नाची वरात नाकं वाण्याची कापली !!
राघूनं केलं बंड हादरा नाशिक पेठाला
इंग्रज सरकारला याने धडा शिकविला !!
२) ‘सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी’ – डॉ.गोविंद गारे
३) Gazetteer of India – Maharashtra State, Ahmednagar District
झोपडी
या झोपडीत माझ्या
असे स्वर्ग सुखाची जाणीव
टीपं गळती पाण्याची जरी
नसे ओल्या सुखाची उणीव
असे गवताचे छप्पर
परी त्याला महालाची सर
चाले पाऊस वाऱ्यासंग लढा
पाठी उभा असे सह्यकडा
शेणं मातीनं सारवल्या भिंती
त्याचा सुगंध दरवळे आसमंती
दारी गवतफुले सजली
आत माझी सानुली निजली
- रv Dagale
गठूडं - कविता
गठुडं
तुह्या रक्ताचं कोडं
मह्या नात्याचं सोड
हे जगणं झालं जड़
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं
तुही असल मजल
रीत थोड़ी बदल
बंगल्यातल्या ताटात
सुटातल्या थाटात
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं
थोड़ा तुझा हात दे
माझा सारा खांदा घे
जाण ऋण पाठीवरचं
बघ फोड़ हातावरचं
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं
प्वारं सिकली
नोकरी लागली
कुणाचं आरक्षण
कोणाला संरक्षण
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं
तू बांधला बंगला
म्या झोपडीत चांगला
पर काळ कसा सोकावला
अज्ञानात समाज लुटला
बघ समाजाकं थोडं
कोण वाहील हे गठुडं
- Raju Thokal
कवी तुकाराम धांडे-1
हिडीव सहाय्य - Artizens
आखाड्या
निम्या रातीला म्हा'बा'ना मना येक्दम् झ्वापातुन् गध्गदा हाल्ईत जागी क्याला. असा मना म्हा'बा'ना झ्वापातुन् कदीच्च् उठाव्वला नवता. मना वाट्ला आथा खरीख्वोट् आखाड् तळ्ला आसल्. आन् मी ड्वोळं चोळीत् उठ्लू. तवर् म्हा'बा' कुडतरी निगून ग्याल्ता. मी ऊठून चुलीम्होरं श्याकाया बस्लो. म्हाय्य्ना चुल पेटून आंन्घुळीच्या टोपात पाणी तापात् ठिव्ला व्हता . पर् म्हाय्च्या ड्वोळ्यात् मना यग्ळीच् 'चमाक' त्या निम्या रातीला दिस्ली. काहीतरी भ्येटल्याचा उल्हास् 'म्हाय्य'च्या ड्वोळ्यामदी दिसोत व्हता. म्हाय्य् मना म्हण्ली ,"आरं आप्ल्या 'भुरीला' वास्रु झालाय्". आन् मी तसाच्च् 'सप्रीकं'(पडवी) पका रगीना पळालु.
तट्कीच्या आंगाला दारामंदीच् 'भुरी' उबी व्हती आन् बाजुला नईन पाव्ना 'वास्रु'. भुरी वास्राला चाटीत व्हती आन् मदीमदी 'हुक्कारत' व्हती. मव्हा दादान्-बाय् (भाव-बहीण) तिढच् बाजुला बस्यैल व्हती. वास्रु वर उठायची क्वोसीस करीत् व्हता. मदी मदी पुना खाली पडत् व्हता. मना लै नवाल वाटत् व्हता. त्या वास्रु जलाम्ल्यावं काही तासामंदीचं उटून् उबा रात् व्हता.
'दिसा-मासा' वास्रु म्वोटा व्हत् ग्याला. तांम्डा रंग, खाली प्वोटाला भुरकट तांम्ब्डा, बोल्क् ड्वोळं, कपाळाच्या मदोमध् तांम्ड्या रंगाला सोड्वान् म्हणुनं ढवळा टिप्का, भवरं पण् येक्दम् किल्लैर, बेंम्ब्टात येक्दम् सड्सडीत. आखाडात् (आषाढ महीना) झाल्ता म्हनुन म्हा'बा' त्याला "आखाड्या" म्हणू लाग्ला. गुरा चराया ग्येली का मी "आखाड्या" बरूबर ख्येळाय्चु. त्याला 'आंन्जाराय्यचु-गोन्जांरायचु'. तेचेसी ब्वोलाय्चु. मी साळातुन् ययचो तवर् जनाव्रा घरी ययेल् नसायची. "आखाड्या यैय् आखाड्या" असा म्या आवाज् देतुय् कुडंत्त् आखाड्या लग्यैच उठून बसाय्चा आन् मह्याकं पहून बारीक्बारीक् आवाजामंन्दी हांम्ब्रायचा. मंग मी "आखाड्याचा" दावा सोडून त्याला आंग्नातुन् पळवायचो. मंग् त्योय् बी मह्या मांन्गा पका 'रगीना' पळाय्चा. आमी यक्दम् जीवाभावाचं 'मैतर' झाल्तो. आखाड्याला मही भास्या नेम्की सम्जायची. मी त्याला 'कव्ळी-कव्ळी' गवताची पेंढी कापून् आनायचु. आखाड्या त्या कव्ळाकाचा गवात येक्दम् मज्यामज्याना खाय्चा. गव्ताची येकय्य् काडी वाया जावु द्याय्चा नै. काही दिसाना आखाड्या गुरांमदी रानात् चराया जाया लाग्ला.
आता मी मराटी साळातुन् राजुरा सर्वदय् हास्कूल्ला जात व्हतु . येक्दीव्सी म्हा'बा'ना मला राजुरातुन 'यसन'(वेसन) आनाया सांगित्ली. आन् त्याच दिसी संद्याकाळी आखाड्यैच्या नाकात 'ववली'. आखाड्या पार वाक्डातिक्डा झाल्ता. त्या टाय्माला यसन् ट्वोच्ताना आखाड्याचं हाल् पहून मना पका 'वंगाळ' वाट्ला. मीय् आखाड्याबरुबर लै रड्लो. तिनच् वरषात म्हा'बा'ना आखाड्याला औताला जुप्ला. आखाड्याला औताला जुपेल् पहून मना मेल्यावुनमेल्यासारका झाल्ता. मरणासन्न यातना व्हत व्हत्या. तवा मी लै आडकाठी क्येली होती "बा" बरूबर. पण उपेग झाला नय्य्. म्हा'बा'ना तेच्या 'ठिवणी'त्ली येक् "निबार् शी" हाड्सून मना बाजुला क्याला व्हता. आखाड्या जवा नांगोर वडायचा तवा मना लै "यद् ना"( वेदना) व्हयच्या . पर् "बा" च्या म्होरं मवा ईलाज खुटाय्चा. आन् मंग् मी मुकाट बांदावं पुस्तुक् वाचीत् बसाय्चो.
आखाड्या आता म्वाठा 'बईल्ल्' झाल्ता. म्हाबाचा सग्ळा अन्याय तो गपचीत 'चहन' (सहन) करीत् व्हता. तरी बी आम्च्या दोघांन्ची मैत्री काय्मव्हती. 'बा'ना आवुत् सोड्ला की मी त्यांना 'आड्व'ला राखनीच्या गवतात् चराया न्येयचु . अग्दी आंन्धार् पडत्तोर् मी जोडीला चारायचु. दुस्र्या बैईल्लापक्षी मी मुटभरकाव्हय्ना आखाड्याला "क्वांडा/चंन्दी" जास्ती चारायचु. पर् मंन्ग 'आखाड्या' आता जास्तीच् "चेहना" झाल्ता. तो त्याच्या जोडीवाल्यैची पण काळजी घ्यैयचा. त्याला जास्ती घालेल् वैरण, क्वोंडा-चंदी तो तेच्या पाटनरला सिलक् ठिवाय्चा. नाईलाजाना मला मंग ती वैरण् क्वोंडा तेच्या ज्वोडीदाराकं सरकावाया लागायची. मुक्या जन्वाराला किती 'समज' रह्यैतेय् ह्या तवा मला समाज्ला. माणसाना तेंच्याकून काई शिकावा आसा.
त्या साली जनाव्राली "खताची" (जनावरांचा संसर्गजन्य आजार) साथ् आली व्हती. त्या साथीत "आखाड्याचा" ज्वडीदार दगाव्ला. बरीच गाय्वास्रा पण त्या सातीत म्येली. आता "आखाड्या" आन् द्वनच्यार गाया उरल्या व्हत्या फक्ती. आम्ची बरीच हानी झाल्ती. काही गावांमंदी त् गोठ्च-ग्वोठ्च सुनाट् पड्ल. त्याच् साली मह्या आक्काचा(बहीण) बी लगीन् जम्ला. आता लग्नाच्या खर्चीचा कराय्चा काय? असा ईषेय् घरात सुरू झाला. क्वोंम्ब्ड्या आन् सेळ्या 'कट्वून' (ईकूण) बी लग्नाचा खर्च मिटत् नवता. मग सग्ळी ब्वाटा "आखाड्याकं" वळाली.
जसा आखाड्याचा ईषेय् निघाला त्या दिसापसून त्वांडावं गोदी पांघ्रून, मी म्हा'बा'चा आन् म्हाय्चा सम्दा ब्वोल्ना आय्कायचु. आखाड्या वपाय्चा??? आखाड्या वपाय्चा???
राजूरचा परद्क्क्षान (बईल्ल् बाजार) पंध्रा दिसवं आल्ता . त्या आट् दिवस् म्या आजाराचा ढ्वांग् घ्येवुन् साळाला दांडी मार्ली. मागून नाताळाच्या सुटया लाग्ल्या. मी रोजीला आखाड्याला घ्येवुन् राजुरच्या सिवारात् "वंग्नाच्या डवर्यावं" जावुन आंगुळ् घालाय्चो. त्याला आंधारपडस्तवर मोढ्याला चारायचु. कंदी कदी भावना येक्दम् दाटून् ययच्या. मंग आखाड्याच्या गळ्यात पडुन गळा काडून हाम्सून-हाम्सून् रडायचु. किती समज व्हती त्याला बी तो मही पाठण् चाटायचा. जास्ती येळ् झाला का मंग् हाळुहाळु घराकं निंगायचा. मी येत् नै पहुन् पुना माग् फिराय्चा. आन् मला शिंगाना हाळूच् ल्वाटायचा...
सेवटी तो दिवस आलाच्. रैवार सरला आन् सोम्वार् उज्याड्ला. आज राजुरचा 'परद्क्क्षान' "बा" ना घुंगरमाळा 'आखाड्या'च्या गळ्यात बांदल्या. 'माटवठ' कपाळावं बांदली. कास्रा लावला. म्हाय्यना सुपात "तांबकुडयचा" भात "आखाड्याला" खाया आन्ला. आखाड्याना भात् फक्ती हुंगला, खाला नय्य्.
बाना "आखाड्या" आरोळी द्याताचं तो जड पावलानी चलाया लाग्ला. मला 'बा' ना आदिच् तागीद् देवुन् ठिव्ली व्हती. " त्वा परदक्क्षानाला ययचा नै "...
आखाड्याला सोडाया, 'म्हाय्य'नं मी लपत-लपत् आर्ध्या वाटापोत् गेल्तो. मुरंबाटी सोड्ली.... आन् आखाड्या हंम्बराया लाग्ला. ती वाट् त्याला नईन व्हती. तसा आखाड्याचा चालणा मंदाव्ला. मागं फिरून हांम्ब्रायचा. धाईस् पाव्ला ग्यालान् चलाय्चाच् थांब्ला. "बा" चाब्काचं फट्कं आखाड्याच्या पायांन्व् हानाया लाग्ला. पण आखाड्या चलच्ना. आखाड्या तिड्च् बस्ला. बाना आखाड्याच्या सेप्टीला चाव्ला तरी त्यो उठना. मला ह्या सम्दा देख्वत/ हेरव्त् नवता... आन् मी आय्यला न् सांग्ताच्च् मुरंबटीकं पाचपाय्यरेच्या तेढानी 'चिंगाट' उडी ठोक्ली. मला हेरताच् 'आखाड्या' उठून् बस्ला. 'बा' पार घामागूम झाल्ता. न सांन्गताच् म्या बाच्या हातातुन कास्र्या घ्यात्ला. तसा 'आखाड्या' मह्या मांग-मांग् चलू लाग्ला. मगं देसमुखवाडीच्या दुदकेंन्द्राच्या ईहरीवं आखाड्याला पाणी पाज्ला. ईस्-पंचीईस् मीन्टात् आमी परदक्क्षानामदी पोह्चलु. खुटा ठोकीतोय्य् कुढं त् गिर्हाईकांचा आखाड्या भोती "भिरकिंन्डा" पड्ला.
आखाड्याला नासिकच्या तिकं 'सटाने'च्या गिर्हाईकांनी खरेदी केल्ता. मव्हा "आखाड्या" आता ल्वोकाचा झाल्ता. ती ल्वाका आग्दी खुशीत व्हती. 'बा' नं पैसं मोजून क्वोप्रीच्या खिस्यात घात्लं. आता आखाड्याला त्या ल्वाकांन्च्या गाडीपोत सोडायचा व्हता. तेंन्ची गाडी तिकं पिपारकना रोडला व्हती. पण त्या ल्वाकांकं कास्रा नवता. ते कासर्यासह आखाड्याला मागत् होते. हुज्जैत् खात व्हती. तव्हा म्हा'बा' गरजला... "कास्र्या आमी द्यैणार नै, यव्हार म्वाड्ला तरी बेहत्तर". मंग त्या ल्वाकांनी कुडून्तरी कास्र्या आन्ला. तवर् आमी आखाड्याला घ्येवुन् गाडीपोत् पिपारकना रोडला पोच्लु. 'बा' घुंगरमाळा आन् माटवठ सोडीत् व्हता. मह्याकं कास्र्या फेकून त्यो माणूस् म्हण्ला, "बांन्दरे भाव्ड्या ह्यो कास्र्या". ह्या सम्द्या गडबाडीत मवा आखाड्याकं ध्यानच् नवता. जवा कासर्या 'सोडाया-बांदाया' गेलु त् मलाच् रडाया आला. आखाड्याच्या दोन्हीय्य् डोळ्यातुन आस्रू वाहात् व्हतं... आखाड्या 'रडत' व्हता. 'बा' च्या पण ह्या ध्यानात यया यळ् नै लाग्ला. आता आम्ही तिघेही आवाज् न् कर्ता रडत् व्हतो. 'आखाड्या, बा आन् मी'.... शेवटी 'बा' ना आखाड्याच्या पाठीवरून सेवटचा हात फिराव्ला, आखाड्येच्या पाया पड्ला.... आन् खांद्येवरच्या उपारण्यात "हुंन्दका" लप्ईत् म्हण्ला...
"जा 'बा' तुला 'वतान' नै, जीढं जासील् तीढं सुकी रह्यै"
"आखाड्येची खरीखोट् गोट्"
शब्दांकन- निसर्गवासी - धोंन्ड्या बांम्बळ्याचा तुळ्शा
"लांब् डांन्गाणात"
Wednesday, July 11, 2018
संदेस - संतोष अनुसया दगडू मुठे
आजपर्यंत सांस्कृतिक मुल्ये व मौखिक भाषा जपणा-या आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक म्हणजेच आज आपण blog ची निर्मिती करीत आहोत. भविष्यातही आपणांकडून असाच प्रतिसाद लाभेल यात तिळमात्रही शंका नाही.
साहित्याची चळवळ ही माणसाला स्वत्वाची जाणीव करून देत असते. म्हणूनच साहित्याच्या चळवळीने जोर धरणे अपेक्षित असते. बदलत्या समाजरचनेबरोबरच आदिवासींच्या रुढी-परंपरा, ऐतिहासिक संस्कृती, सामाजिक एकात्मता व मौखिक संस्कृती लयास चालली आहे. अशावेळी आदिवासी बांधवांना आत्मसन्मानाची चळवळ वा-यावर सापडणार नाही. तिच्यासाठी स्वतःची संस्कृती, स्वतःचा इतिहास आपणच शोधून जगासमोर आणावा लागेल. हेच काम आपला संवर्धन आपल्या भाषेचे हा ग्रुप गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. आदिवासी बांधवांनी अनंत अत्याचार होऊनही जिला लिपी नाही अशी आपली भाषा, संस्कृती व इतिहास मौखिक पद्धतीने जपून ठेवला. याच मुक संस्कृतीला लिखित स्वरूप देण्याचे काम आपण करीत आहोत .
साहित्य हा एक संस्कृतीचा उन्मेश आहे. संस्कृतीचेच प्रतिबिंब भाषा आणि साहित्य यामध्ये उतरत असते. समाजाला संस्कृतीला व भाषाला जिवंत ठेवायचे असेल तर आदिवासी आस्मितेशिवाय ते शक्य होणार नाही. आज सांस्कृतिक आक्रमण, सामाजिक आक्रमण, बहूभाषिक आक्रमण व आर्थिक शोषण असे चहूबाजूंनी घाला होत असताना आजचा तरूणवर्ग आशावादी आहे ही एक जमेची बाजू आहे. त्याला शिक्षणाची दिशा बदललेली हवीयं...त्याला शिक्षणाची नवी दृष्टी हवीयं...प्राथमिक शिक्षणात बोलीभाषेला स्थान असावे असा आग्रह होऊ लागलाय...मावळी, डांगाणी व महालदेशी भाषांतून संवाद साधून आपण एकप्रकारे मौखिक भाषेला नवसंजीवनी देण्याचे कामच करीत आहोत. त्याच बरोबर नवख्या शब्दांचा संग्रह करून किंवा त्या शब्दाची उकल करून अनभिज्ञ असलेल्या बांधवांना त्याचा अर्थ सांगण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. आज अनेक बोली भाषा नष्टत्वाच्या मार्गावर आहेत. पुढील वर्ष UNO या जागतिक संघटनेने आदिवासी भाषा वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. अशावेळी आपल्याकडूनही भाषा संवर्धनाचा जास्तीतजास्त प्रयत्न व उपयोगात आणणे गरजेचे आहे. नवीन blog साठी हार्दिक शुभेच्छा....!
- संतोष अनुसया दगडू मुठे.